मंगलवार, 13 दिसंबर 2022

"भूख - कहानी एक जानवर की" मास्क टीवी' पर 15 दिसंबर से

शंकर मराठे, मुंबई - 13 दिसंबर, 2022 : जैसे-जैसे तापमान में गिरावट आती है, उत्सव का रंग चढ़ने लगता है। ऐसी परिस्थितियों के बीच एक नए और अनोखे ओटीटी प्लेटफॉर्म  "मास्क टीवी" ने भारतीय मीडिया और मनोरंजन में कदम रख दिया है।

आत्मा को झकझोर देने वाला शो  "भूख - कहानी एक जानवर की" इस ओटीटी प्लेटफॉर्म पर 15 दिसंबर से एक संपूर्ण मनोरंजन के साथ like बेनकाब होगा।

मास्क टीवी के मेंटर संजय भट्ट सिनेमा की कला और इसकी सामग्री के प्रति जुनूनी हैं। वह कम बोलने वाले व्यक्ति के रूप में जाने जाते हैं, लेकिन विभिन्न रुचियों वाले व्यक्ति भी हैं। इस सीरीज पर वे कहते हैं, "भूख रियल स्लम की लोकेशन पर शूट हुई 5-एपिसोड की सीरीज है। इन झोपड़ियों में रहने वाले लोग ज्यादातर कम शिक्षित हैं और बहुत कम आय पर जीवन यापन कर रहे हैं। जो कई बार उनकी मूलभूत आवश्यकताओं को भी पूरा नहीं करती है। पड़ोस में ऊंची इमारतों को देखते हुए, यहां रहने वाले युवा एक दिन कुछ बड़ा करने का सपना देखते हैं।"

मास्क टीवी की प्रमोटर और इस शो के निर्माताओं में से एक, अंजू भट्ट कहती हैं, "भूख... एक बार फिर हमारे अन्य शो की तरह एक महत्वपूर्ण कहानी है जिसमें बहुमुखी अभिनेताओं के साथ झुग्गी-झोपड़ियों के महत्वाकांक्षी और प्रतिभाशाली कलाकार हैं। इसमें रोमांटिक पल, भावनाएं, रिश्तों को परिभाषित करने वाले लम्हे, विश्वासघात और आत्मा को झकझोरने वाले दृश्य हैं जो सभी दर्शकों के साथ आसानी से जुड़ जाएंगे।

चिरंजीवी भट्ट, 'मास्क टीवी' के सी.ई.ओ और निर्माताओं में से एक ने कहा, "टैग प्रोडक्शंस एक पुराना प्रोडक्शन हाउस है जिसने नब्बे के दशक की शुरुआत में दूरदर्शन के लिए कई सफल धारावाहिकों का निर्माण किया है। उन सीरियल्स की तरह हमारा ओटीटी प्लेटफॉर्म भी है जो उच्चतम गुणवत्ता वाले मनोरंजन पैकेज देने के लिए प्रतिबद्ध है। सच्ची और लोकल कहानी के साथ इसमें जड़ से जुड़ी कहानी इसे और अधिक अद्वितीय बनाती है।

"आज जिस तरह की कहानी देखने की उम्मीद दर्शकों को सबसे अधिक है। दर्शकों को यह महसूस होना चाहिए कि पर्दे पर जो कुछ हो रहा है वे भी उसका एक हिस्सा है। यहां विचार यह है कि हमारे प्रत्येक कंटेंट में प्रामाणिकता बनी रहे। समाज में जो हो रहा है। उसे बेनकाब होना चाहिए और इस प्रकार के विषय हमारे सभी वेबसीरीज के लिए निर्धारित हैं। यदि आप एक अच्छी कहानी बनाते हैं तो इसकी एक यूनिवर्सल अपील होगी...," 'मास्क टीवी' की निदेशक मानसी भट्ट और टैग प्रोडक्शंस के निर्माताओं में से एक बताती हैं।

 "मिशन 70", देशभक्ति और राजनीतिक ड्रामा से भरपूर एक स्पाई थ्रिलर है। इसे पूरी तरह से कश्मीर में उनकी अनुभवी टीम और स्टार कास्ट के साथ शूट किया गया है। 6-एपिसोड की इस सीरीज को 9 दिसंबर को स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म की ओपनिंग के साथ लॉन्च किया गया था। इसके बाद एक थ्रिलर "मसूरी हाउस" 13 दिसंबर से "भूख-कहानी एक जानवर की" 15 दिसंबर से शुरू होगी;  "डबल शेड्स" 18 दिसंबर को और "प्रोजेक्ट एंजल्स" 20 दिसंबर को स्ट्रीम होगी।

ओरिजनल कॉन्सेप्ट के साथ इस सर्दी को अपने परिवार और दोस्तों के साथ सेलेब्रेट करने के लिए मास्क टीवी, नया ओटीटी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म बेहतरीन जगह है। चाहे वह मनोरंजन हो, थ्रिलर हो, गुदगुदाने वाला कंटेंट हो, अनकही कहानियां हों, खेल हों, कारोबार हो, जीवन शैली हो, स्वास्थ्य हो, यात्रा हो, छुट्टियां हो और अन्य पहलू हों, मास्क टीवी 

यह ओटीटी प्लेटफॉर्म यूजर फ्रेंडली ऐप है जिसे Google Play, Apple और Jio से आसानी से डाउनलोड किया जा सकता है।

गूगल

https://play.google.com/store/apps/details?id=com.masktv.app

एप्पल

https://apps.apple.com/in/app/mask-tv/id6443824063

मास्क टीवी टाइटल ट्रैक

https://youtu.be/jwKJR0OdonI

(राज तुम्हारे..)

यूट्यूब

https://www.instagram.com/reel/ClonaDEIyM2/?igshid=YmMyMTA2M2Y= (भूख- कहानी एक जानवर की)

https://youtu.be/or8-yEkPpTQ (मिशन 70)

https://youtu.be/NHlAtoKJFKM

(मसूरी हाउस)

https://youtu.be/yG92V5ayVGE

(डबल शेड्स)

https://www.youtube.com/watch?v=5esTo5f8-Dg (प्रोजेक्ट एन्जिल्स)

शुक्रवार, 18 जनवरी 2013

फिल्मी न्यूज – 19-01-2013

सनी च्या चित्रपटात सनी लियोनचा आयटम नंबर

सनी लियोन बेचारी सांगून सांगून थकून गेली आहे की ती कुठल्याही चित्रपटात आयटम सांग करत नाही आहे आणि संपूर्ण लक्ष सध्या ‘रागिनी एमएमएस 2’वर आहे ज्याची ती शूटिंग करत आहे. अनिल शर्मा हे सनी देओलला घेऊन चित्रपट ‘सिंह साहब द ग्रेट’ तयार करत आहे आणि त्यांनी एका आयटम सांगसाठी सनी लियोनशी संपर्क साधला होता, पण ते काही शक्य झालेले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे सनीने त्या आयटम साँगची एवढी मोठी रक्कम मागितली की अनिलने सनी लियोनला या साँगसाठी घेण्याचे मनातून काढून टाकले आहे.मध्य प्रदेशात सिंह साहब द ग्रेटची शूटिंग सुरू होणार असून या वर्षात ते चित्रपट रिलीज होईल. सध्या अनिल शर्मा एका अशा चेहर्‍याच्या शोधात आहे जो त्यांच्या चित्रपटात सेक्सी आइटम साँग करू शकेल.



कैटरिना-अक्षय कुमार पुन्हा एकत्र

नमस्ते लंदन, वेलकम आणि सिंह इज किंग सारखे सफल चित्रपट अक्षय कुमार आणि कॅटरीनाच्या जोडीने दिले होते. तीस मार खां आणि दे दना दनचा परिणाम जेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगला नाही पडला तेव्हा अक्षय आणि कॅटरीनाने आपल्या जोडीला काही दिवस ब्रेक दिला. त्यांना वाटले की सारखे सारखे त्यांची जोडी बघून प्रेक्षकांना आता एवढा इंटरेस्ट राहिलेला नाही. किमान अडीच वर्षांनंतर दोघेही परत एकत्र काम करीत आहे. ‘राउडी राठौर’च्या माध्यमाने यश मिळवून चुकले संजय लीला भंसाली एकदा परत साऊथचा रीमेक बनवत आहे. याचे निदर्शन दक्षिण भारतीय दिग्दर्शक एम. राजा करणार आहेत.



तब्बू रेड कार्पेट वर

बॉलिवूडमधील अभिनेत्री तब्बू आणि नवोदित अभिनेता सूरज शर्मा यांनी आंग ली यांच्या 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटासाठी ७० व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतला. 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटाला तीन श्रेणंमध्ये नामांकन मिळाले होते. आपल्या सहज अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या तब्बूने पुरस्कार सोहळ्याच्या वेळी लाल रंगाची साडी परिधान केली होती. तर सूरज काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला.



अक्षय कुमार बनला गायक

आजपर्यंत कुंदनलाल सैगल यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, गोविंदापर्यंत अनेक हिरोंनी स्वत:ची गाणी स्वत:च गायिली आहेत. अर्थात सैगल किंवा किशोरकुमारसारखे अभिनेते हे उत्तम गायक होते, मात्र अनके अभिनेत्यांनी केवळ एक वेगळेपण, हौस म्हणून गाणी गायिली. आता अशा अभिनेत्यांच्या पंक्तीत अक्षयकुमारही जाऊन बला आहे. त्याने 'स्पेशल छब्बीस' या आगामी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. त्याचे हे गाणे एक सॉफ्ट रोमंटिक गाणे आहे. 'मुझमें तू है' असे या गाण्याचे बोल आहेत. एम.एम. करीम हे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत. सुरुवातीला अक्षय गाणे गाण्यासाठी तयार नव्हता. एक महिनाभर प्रयत्न करून त्याचे मन वळवण्यात आले आणि त्याने आपल्या बसक्या आजवात गाणे गाण्याचे धाडक केले! त्यापूर्वी त्याने संगीताची जुजबी माहितीही करून घेतली. पाच महिने तयारी केल्यावर मग त्याने गाणे गाण्यासाठी तोंड उघडले, मात्र त्याची ही मेहनत चांगलीच फळाला आल्याचे म्हटले जाते. हे गाणे चांगले झाले असल्याची चर्चा आहे. आता संजय दत्त 'ए शिवानी' करू शकतो किंवा आमीर खान 'आती क्या खंडाला' करू शकतो तर अक्षय कुमार 'मुझमें तू है' का करू शकणार नाही? कदाचित त्याला 'कोलावरी डी' सारखी लोकप्रियता मिळेल!

मंगलवार, 15 जनवरी 2013

बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची संस्कृति नष्ट होण्याच्या मार्गावर

कल्याण, 16 डिसेंबर – चाळ नावाची वाचाळ वस्ती म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबई नगरीची शान. परंतु आता ह्याच मुंबई नगरीत चाळ नावाची वाचाळ वस्त नष्ट होत आहे. ही एक काळजी करण्याची बाब आहे. एवढचं काय तर आता मुंबई नगरी बरोबर ठाणे जिल्ह्यातील चाळी देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

कल्याण पश्चिमे कडील खास करुन बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची मराठ-मोळी संस्कृति नष्ट होण्याचा मार्गावर आहे. ह्याचे कारण एकदम सोपे आहे, कारण सध्या बिर्ला कॉलेज परिसरातील रस्ते मोठे करण्याची योजना जोरात सुरु झाली आहे व रस्ते मोठे करण्या संबंधी बोर्ड प्रत्येक विभागात लावले आहेत. जर ह्या विभागातील रस्ते मोठे झाले तर भविष्यात येथील चाळी रि-डेवल्पमेंट मध्ये जातील आणि बिल्डरांना एफएसआई वाढवून घेण्यास नक्कीच ह्याचा फायदा होईल. बिर्ला कॉलेज परिसरात जय भवानी नगर, अनुपम नगर, सह्याद्री नगर 1-2, नवनाथ नगर, बी के नगर, सह्याद्री नगर 3, सम्राट नगर, भोईर वाडी व इतर चाळी चे विभाग प्रामुख्याने मोडले जातात.

चाळ नावाची वाचाळ वस्ती म्हणजेच मराठी संस्कृतिचा अभिमान व ह्याच अभिमानामुळे ह्या नगरातील नागरिक दत्त जयंती, मकरसंक्रात, होळी, गुडी पाडवा, राम नवमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी, शिवजंयती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखे सण मराठ-मोळ्या शैलीत मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे करतात, परंतु आजच्या मॉर्डन युगात सर्व काही नविन करण्याच्या प्रयत्नामुळे, सध्या ह्या विभागातील रस्ते सुधारण्याचा उपक्रम जोरात सुरु आहे व भविष्यात ह्या विभागीतल चाळीचे रि-डेवल्पमेंट नक्कीच होऊ शकते ह्या बद्दल तर काही शंका करण्याचे कारणच नाही आहे. म्हणूनच बिर्ला कॉलेज परिसरातील चाळ नावाची संस्कृति नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

ह्या विभागात नवीन रस्ते बनविण्याचा उपक्रम सुरु झाल्या पासून ह्या परिसरातील चाळीतील घरांचे भाव देखील बिल्डिंगमधील फ्लैटच्या किमती सारखे वाढू लागले आहेत आणि सध्या 200 ते 250 स्केअर फुटाचा रुम देखील 10 ते 15 लाख रुपयात विकला जात आहे. ह्या विभागातील घरे विकून रहिवाशी कल्याण पूर्वेकडे 3-4 लाख रुपयाच्या किमंतीत चाळी मध्ये रुम घेत आहेत. त्याच बरोबर काही रहिवाशी तर आपली घरे विकून शहाड, आंबिवली, टिटवाळा येथे देखील 2-3 लाख रुपयाच्या किमंतीत चाळी मध्ये नवीन रुम घेत आहेत.

शुक्रवार, 28 दिसंबर 2012

नविन वर्षात बी के नगरच्या चाळीवर बुलडोजर फिरणार ......काय?

कल्याण – नवीन वर्ष येणार म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी देशा-विदेशात देखील एकदम धूमधडाक्याचे आनंदी वातावरण 25 डिसेंबर क्रिसमस च्या सणा पासून सुरुवात होते, परंतु ह्या वेळी कल्याण मधील, बिर्ला कॉलेज, आरटीओ स्थित बी के नगर मधील रहिवाशांची झोपच उडाली आहे व सर्व रहिवाशां मध्ये नाराजगी चे वातावरण पसरले आहे.

सध्या बिर्ला कॉलेज, आरटीओ जवळील बी के नगर विभागात एक चर्चा सुरु आहे कि नविन वर्षात रस्ता मोठा करण्याच्या उपक्रमा अंतगर्त बी के नगर च्या काही चाळी वर बुलडोजर फिरणार आहे ? ह्या संबंधी चर्चेचे कारण एकदम साधे व सोपे आहे कि प्रभाग 14, बिर्ला कॉलेज विभागात मोठे रस्ते करण्याचा नवा उपक्रम सुरु झाला आहे व ह्याच उपक्रमा अंतर्गत आर.टी.ओ.ऑफिस पासून ब प्रभाग क्षेत्र कार्यालय ते गगनगिरी पर्यंत 18 मीटर रुंदी चा नविन रोड तयार होणार आहे. तसेच ह्याच कामासाठी 5.50 कोटी रुपए (5,47,37,258 रुपए) मंजूर करण्यात आहे आहेत व ह्या संबंधी माहिती चे मोठे बोर्ड बिर्ला कॉलेज, आरटीओ परिसरात लागले आहेत.

ह्या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी बी के नगर मधील रहिवाशांनी प्रभाग 14 चे शिवसेना नगरसेवक व केडीएमसी सभागृह नेता श्री रवि पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले कि बिर्ला कॉलेज, भोईर वाडी, आरटीओ, सह्याद्री नगर, बी के नगर व ब प्रभाग क्षेत्र कार्यालय ते गगनगिरी पर्यत नविन रोड बनविण्यात येणार आहे. ह्या संबंधी मार्किग चे काम सुरु आहे. ज्यांची घरे रोड मध्ये जात आहे त्यांना केडीएमसी नोटिस पाठविणार आहे व त्यानंतर रोड मध्ये येणारी घरे तोडण्यात येतील. तसेच तोडण्यात येणारी घरे परत मिळविण्याकरिता त्या घरांच्या मालकांनी योग्य कागदपत्रे घेऊन केडीएमसी कडे अर्ज करावा. केडीएमसी ने एक समिति नेमली आहे ती समिति त्याबद्दल उचित निर्णय घेईल.

त्याच बरोबर बी के नगर मधील रहिवाशांनी प्रभाग 3 चे मनसे नगरसेवक श्री उल्हास भोईर यांची देखील तातडीने भेट घेतली. तेव्हा त्यांनी सांगितले कि 18 मीटर रस्ता बनणार आहे ही माहिती पूर्णपणे सत्य आहे, परंतु जेव्हा ह्या रस्त्याचे प्लानिंग बद्दल केडीएमसी मध्ये ठराव मंजूर झाला होता त्यावेळी मी पूर्णपणे ह्या ठरावास विरोध केला होता. कारण 18 मीटर रुंदीचा रस्ता बनविण्याच्या उपक्रमात 20-30 गोरगरिबांची घरे तोडून विकास करणे, हे तर मला अजिबात पटत नव्हते. मी तेव्हा देखील विरोध केला होता आणि आता देखील ह्या रस्त्याच्या उपक्रमाला पू्र्णपणे विरोध करत आहे. मी ह्या नगराचा नगरसेवक आहे म्हणूनच मी बी के नगर मधील रहिवाशांना न्याय देण्यासाठी सक्षम व समर्थ आहे. केडीएमसी ने रस्त्याची योजना आखण्यापूर्वी बी के नगर मधील स्थानिक रहिवाशांचे मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच काय तर येथील स्थानिक रहिवाशांना हया रस्त्यामुळे काहीच फायदा होणार नाही.

सध्या बी के नगर जवळ आरटीओ ऑफिस आहे व त्यामुळे तेथे दिवसभर गाड्यांची धावपळ असते, परंतु हे ऑफिस लहान पडत असल्यामुळे ते ऑफिस भविष्यात आधारवाडी येथील हलविण्यात येणार आहे. असे देखील तेथील रहिवाशी बोलत आहे. त्यामुळे भविष्यात ह्या रस्त्याचा फायदा कोणाला होणार आहे. ह्याबद्दल तरी सध्या शंकाच आहे.

आर टी ओ ऑफिस पासून 18 मीटर रोड बनविताना कमीत कमी 20-30 घरे तोडण्यात येतील, कारण ही घरे रस्त्याच्या प्लानिंग मध्ये येणार आहे. असे तेथील रहिवाशी म्हणतात.

एवढचं काय तर 1996 साली देखील आर टी ओ ऑफिस ते बी के नगर चा रोड रुंद करण्यात आला होता, परंतु त्या वेळचे शिवसेना नगरसेवक श्री राजेंद्र देवळेकर यांच्या मध्यस्थीने बी के नगर मधील रहिवाशांना पूर्णपणे न्याय मिळाला होता. त्यावेळी रोड मोठा करताना घरे तोडण्यात आली होती व त्याच भागात पुन्हा नवीन घरे मिळाली होती.

बी के नगर मधील रहिवाशी बोलतात कि नवीन रोड बनविण्याच्या उपक्रमात काही चाळीतील घरे गेली तर केडीएमसी ने सर्वप्रथम जाणा-या घरांचे पुर्नवसन करावे व ह्यासाठी केडीएमसी ने घराचे रेजिस्ट्रेशन पेपर, विजेचे बिल, रेशनिंग कार्ड, निवडणूक कार्ड ह्यापैकी दोन-तीन ओळखपत्र मान्य करावे. त्याच बरोबर सध्या राहत असलेल्या घर मालकाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जेणे करुन सध्या ज्या स्थितित रहिवाशी राहत आहेत, त्यांचे त्याच परिस्थितित पुर्नवसन झाले पाहिजे.


परंतु आता नवीन वर्षात म्हणजेच 2013 साला मध्ये काय होईल, ह्या बद्दल बी के नगर मधील सर्व रहिवाशां मध्ये नाराजगी चे वातावरण पसरले आहे. त्यांच्या मनात घरे तुटण्याची भिति उत्पन्न झाली आहे.



मंगलवार, 17 जून 2008

गणपती आरती

सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0।।2।।
लंबोदर पीतांबर फणी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दार रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ0।।